महात्मा फुले ह्यांचे कलाशास्त्र श्रीधर तिळवे नाईक मराठीचे मध्ययुगीन धर्म व मोक्षकेंद्री काव्यशास्त्र मराठी मानसावर आजही वर्चस्व गाजवत असले तरी ते हळूहळू कालबाह्य होत जाणे अटळ होते इंग्रज आले आणि स्वतःसोबत एक अर्वाचीन काव्यशास्त्र घेऊन आले हे काव्यशास्त्र आयडिआलॉजीवर आधारित होते अलबर्ट दि ग्रेट ,रॉजर बेकन निकोलोय मॅकायव्हली ह्यांचा निसर्गप्रमाण्यवाद फ्रान्सिस बेकन ह्याचा इंद्रियप्रामाण्यवाद हे त्याची सुरवात होती देकार्तचा बुद्धिप्रामाण्यवाद हा विस्तार होता तर लॉकचा अनुभवप्रामाण्यवाद हा कल्मिनेशन होता हे सगळेच निसर्गदेहप्रामाण्यवादी होते देकार्त हा ह्यांच्यातील बुद्धिप्रामाण्यवादी होता तर इतर इंद्रियप्रामाण्यवादी जास्त होते मोक्षतेचे तीन अविष्कार असतात १ उदासीन मोक्षता ह्यात मोक्ष मिळाला संपले अशी मोक्षकाची धारणा असते २ मोक्षकेंद्री मोक्षता ह्यात मोक्षक फक्त स्वतःचा मोक्ष बघत नाही तर इतरांनाही मोक्ष मिळावा म्हणून धडपड करतो त्यासाठी धर्मावर धार्मिक मानसिकतेवर हल्ले करतो उदा तुकाराम ३ समाजसुधारणाकेंद्री मोक्षता ह्यात मोक्षक फक्त स्वतःचा मोक्ष बघत नाही...
Posts
Showing posts from June, 2026
- Get link
- X
- Other Apps
एकवाद ,एकतत्त्ववाद ,एकेश्वर वाद, एकदेववाद आणि एकग्रंथदेववाद श्रीधर तिळवे नाईक मानवाच्या आदिम काळात सर्व टोळ्या बहुदेववादी होत्या . म्हणजे आधी अगदी आपण जर वैदिक धर्म पाहिला वैदिक टोळ्या पाहिल्या तर त्या टोळ्यांचापण स्वभाव अनेक देववादी आहे. वैदिक श्रद्धा बहुदेववादीच आहे भगवान शंकर यांच्या आगमनापूर्वी भारतात जे लोक होते त्यांच्या त्यांच्या श्रद्धा या सुद्धा अशाच बहुदेववादी होत्या सूर्य आणि धरती यांचा संबंध हळूहळू लक्षात आल्यानंतर द्विदेववाद उदयाला आला मुख्य म्हणजे सूर्याविषयी आकलन वाढत गेले आणि सूर्यच प्रकाश पाठवतो हे स्पष्ट कळाले आणि तत्कालीन टोळ्यांचा समज असा होता की पाऊस सुद्धा सूर्यच पाठवतो कारण आकाशाची मालकी सूर्याकडे आहे अशी त्यांना खात्री होती . भगवान शंकर जन्मण्यापूर्वी हा द्विदेववाद अस्तित्वात होता की नाही याविषयी काहीही कल्पना येणे अशक्य आहे मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे भगवान शंकरांच्या उपदेशातूनच शिव आणि शक्ती ही दोन तत्वे उदयाला आली आणि यातूनच द्वितत्ववाद उदयाला आला यांच्यापासूनच जगातली पहिली श्रुती निर्माण झाली ती म्हणजे शैव श्रुती होय या श्रुतीमध्ये ...
- Get link
- X
- Other Apps
कॉक्रोच जनता पार्टी , भारतीय जनता पक्ष ,वर्ग , आणि शिक्षण श्रीधर तिळवे नाईक सर्वसाधारणपणे जगामध्ये अनेकांची अशी समजूत असते की एकरेषीय वर्गजालना समाजात अस्तित्वात आहे पण प्रत्यक्षामध्ये असे कधीच नसते प्रत्येक युग स्वतःची वर्गजालना (class netology)घेऊन आलेले दिसते. आदिम युगामध्ये स्त्री आणि पुरुष एवढे दोनच वर्ग होते पुढे श्रद्धा युगामध्ये माणसाला वाढीची जाणीव झाली आणि माणसाच्या वाढीनुसार १ बाल२ कुमार ३ तरुण ४ प्रौढ ५ वृद्ध असे पाच वर्ग उदयाला आले त्यानंतर आलेल्या मोक्षयुगात गृहस्थ आणि संन्यासी असे दोनच वर्ग निर्माण झाले त्याचा सर्वोच्च आकार आपणाला मोक्ष युगानंतर धर्म युगानंतर आलेल्या धम्मयुगात बौद्ध धर्मात दिसतो जगात सर्वत्रच महाश्रद्धा व धर्मयुगात पुरोहित ,शासक, व्यापारी, सेवक आणि गुलाम असे स्पष्ट पाच वर्ग उदयाला आले आणि प्रत्येक धर्माने (अपवाद फक्त शैव) गुलामगिरीचे समर्थन केलेले दिसते यानंतर आलेल्या वैज्ञानिक युगात मात्र अनेक वर्ग निर्माण झालेले दिसतात त्यात प्रामुख्याने ज्ञानीक ,सामाजिक, आर्थिक, राजकीय वर्गीकरण केंद्रस्थानी आलेले दिसते . प्रत्येक वर्गाची एक व्यवस्था निर...
- Get link
- X
- Other Apps
प्रश्न: तुम्ही मोक्षाविषयी का बोलत नाही ? श्रीधर तिळवे नाईक: मोक्षाविषयीची बोलणे आणि मोक्ष यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. मोक्षाविषयी आतापर्यंत जे जे काही बोलले गेले आहे त्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. याचा अर्थ मी अजिबात बोलत नाही असा नाही जेव्हा अस्सल साधक येतो तेव्हा मी बोलतो पण हल्ली साधक कमी आणि करमणूक करायला येणारे लोक जास्त येतात त्यांच्या दृष्टीने मोक्ष ही सुद्धा करमणूक आहे ते स्वतःच्याच मनाचे मनोरंजन करत असतात अनेक कलावंत तर फक्त प्रेरणा घेण्यासाठी येत असतात . त्यांना मोक्षाची काडीची साधना करायची नसते . आपल्या कलेला काय उपयुक्त आहे ते ते शोषून घेतात आणि निघून जातात काही फक्त त्यासाठीच फोन करत असतात अस्सल साधक एक दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना नेमका प्रश्न घेता येतो . बाकी तुम्ही कितीही काहीही वाचत बसला लिहित बसला तरी ते सर्व काल्पनिकच आहे मोक्षाविषयी कितीही प्राचीन लिखाण असो ते सर्व रद्दी आहे या रद्दीत मी कशाला भर टाकत जाऊ ? अनेकांना तर धर्म आणि मोक्ष यांच्यातला फरकच कळत नाही. कारण आपल्याकडे धर्म हाच मोक्ष समजण्याची फार मोठी मूलभूत ...
- Get link
- X
- Other Apps
आजच्या काळात मोक्ष मिळवण्याचे प्रयत्न का फसतात? श्रीधर तिळवे नाईक सर्वसाधारणपणे ज्याला आपण वास्तव समजतो ते अनेकदा आपल्याच मेंदू ने तयार केलेले असते अनेकदा जी चिन्ह संस्कृती असते तिनेच वास्तव बनवलेले असते आणि जी त्या चिन्ह संस्कृतीची भाग असलेली भाषा संस्कृती असते तिच्यातच तुम्ही वावरत राहता म्हणजेच एका अर्थाने सत्य जे अनंत आहे आणि जे शून्य आहे त्याच्या तुम्ही आत आहात आणि तुम्हाला तर शून्य व्हायचं आहे कारण मोक्ष मिळण्याचा अर्थ शून्य होणे आहे किंवा असणे आहे . आणि प्रत्यक्षात तुम्ही शून्याच्या आत आहात . म्हणजे तुमचे सगळे मेडिटेशन वगैरे प्रकार हे आत आहेत आणि प्रत्यक्षात मोक्ष याच्याही पेक्षा अनंत आहे आणि शून्य आहे त्यामुळे मिठीत घ्यायला हात कुठे आहेत ? हात तर मर्यादित आहे. मेंदू मर्यादित आहे . त्यामुळे जे वास्तव कळते ते फक्त प्रोजेक्शन आहे आणि प्रोजेक्शन म्हणजे मोक्ष नव्हे . म्हणजेच तुम्हाला नेटवर्क पाहिजे आहे पण प्रत्यक्षात तुम्ही नेटवर्कच्या आत आहात तुमचे नेटवर्क तुमच्याच चिन्ह व्यवस्थेचे प्रोजेक्शन आहे आणि हे प्रोजेक्शन तुम्हाला वास्तव पाहायला शिकवते तर तुम्ही ते बाहेर जाऊन ...
- Get link
- X
- Other Apps
सावरकरांची शत्रूता, शत्रू क्रमांक एक, शत्रू क्रमांक दोन आणि शैव हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक सावरकरांचे संपूर्ण आयुष्य हे क्रांतिकारक सावरकर आणि अंदमान तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे हिंदुत्ववादी सावरकर अशा दोन कालखंडामध्ये विभागता येते. तुरुंगात जाण्यापूर्वी सावरकरांचा शत्रू क्रमांक एक स्पष्ट आणि स्वच्छपणाने इंग्रज आहे त्यासाठी ते अभिनव भारत नावाची संघटना काढतात स्वातंत्र्याच्या प्रचंड पुरस्कार करतात त्यासाठी पुस्तके लिहितात ती पुस्तके बॅन होतात आणि मग शेवटी त्यासाठी तुरुंगात जातात मात्र या तुरुंगात त्यांना मुस्लिम धर्मातील कैद्यांचा काही वेगळा अनुभव येतो आणि ते बदलतात अंदमान मधून बाहेर आल्यानंतर सावरकर आपला शत्रू बदलताना दिसतात 1922 पूर्वी सावरकरांचा शत्रू क्रमांक एक इंग्रज होते पण आता हा शत्रू मुस्लिम होतो आणि ते हिंदूंची विभागणी सुद्धा मुस्लिमांच्या दिशेने जाणारे हिंदू आणि मुस्लिमांच्या विरोधात असणारे हिंदू अशी करतात त्यामुळे अर्थातच मग शत्रू क्रमांक दोन ही जागा काँग्रेस आणि भाजप महात्मा गांधी यांनी घेतली कारण हे स्पष्ट पणाने मुस्लिम वादी आहेत असे त्यांचे म्हणणे होते सावरकरांनी ...
- Get link
- X
- Other Apps
सावरकर कौटिल्य शत्रूशी वागायची नीती आणि उदाहरणार्थ जॉर्ज फर्नांडिस श्रीधर तिळवे नाईक भाग सहावा ज्या वेळेला गांधी आणि नेहरू शत्रूंच्या बाबतीत प्रचंड भोसट होते त्या काळामध्ये शत्रूंच्या बाबतीत सतर्क असण्यासाठी लागणारा अवेअरनेस ज्या काही मोजक्या लोकांच्याकडे होता त्यापैकी एक सावरकर आहेत याबद्दल कोणालाही शंका असू नये त्यामुळेच सावरकरांना याबाबतीत काही श्रेय देणे आवश्यक आहे सावरकरांनी नेहमीच ठकाला महाठक असावे अशी भूमिका घेतलेली दिसते . प्रश्न असा आहे की पण समोरचा ठक आहे का हे कसे तपासायचे की सरसकट सर्वांनाच ठक मानून उगाचच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी महा ठक व्हायचे ? याच नीतीचा एक भाग अर्थातच कोणाला मित्र करावे आणि कसे करावे याबाबतीतले धोरण आहे . या संदर्भात जॉर्ज फर्नांडिस यांचे उदाहरण घेता येईल कारण आज त्यांची जयंती आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून हिंदुत्वाचा विचार करावा लागेल हे गृहीतक ज्या लोकांनी आमच्या पिढीच्या दारात आणून ठेवले त्यात नामदेव ढसाळ आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा फार मोठा वाटा आहे . आता मात्र या दोघांचे हिंदुत्ववाद्यांनी नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित झाला आहे इतकी ...
- Get link
- X
- Other Apps
सावरकर आणि मनुस्मृति ५ श्रीधर तिळवे नाईक भारतीय इतिहासामध्ये मनु इतकी गुंतागुंतीची गोष्ट नसावी हा शब्द मन या शब्दापासून तयार झालेला आहे असे दिसते काहींच्या मते मनन पासून ! मनूचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात दिसतो ( १:८०:१६ १: ११४:२ २:३३:१३) ऋग्वेदात तर मनुने दाखवलेल्या मार्गापासून मी च्युत होऊ नये अशी प्रार्थना ही केलेली दिसते काहींच्या मते मनुनेच प्रथम यज्ञ शोधला आणि पहिला यज्ञ मनुनेच केला आणि ही परंपरा चालवणाऱ्या सर्वांनाच पुढे मनू म्हटले गेले मात्र त्यासाठी त्यांचे प्रजापती असणे ही एक अनिवार्य अट मानली गेली म्हणजेच प्रजापती सुद्धा अनेक होते परंतु जे धर्मशास्त्र जाणत होते अशा प्रजापतींना मनु म्हटले जात होते त्यामुळेच महाभारतात शांती पर्वात स्वायंभुव मनू आणि प्राचेतस मनू यांचा उल्लेख येतो त्यावरून मनु अनेक असावेत हे स्पष्टच दिसते वैष्णव लोकांच्या मधील एक गट असा आहे जो महाभारताला मनुस्मृति नंतरची वैष्णव लोकांच्यासाठी लिहिली गेलेली वेगळी स्मृती असा दर्जा देतो. त्यामुळेच नवव्या शतकानंतर अनेकदा महाभारत धर्मप्रमाण मानले गेलेले आहे कारण ती वैष्णव लोकांची स्मृती आहे . खुद्द ...
- Get link
- X
- Other Apps
सावरकर ४ सावरकर, विज्ञानशीलता आणि स्वातंत्र्य श्रीधर तिळवे नाईक मागील दोन लेखात आपण हे पाहिले की धर्मशास्त्र कसे पुरोगामी राज्यशास्त्रावर राज्य करत होते सत्ता प्रणालीला प्रभावित करत होते .त्यामुळे युरोपमधील प्रत्येक विचार प्रणालीवर कळत नकळत ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडला. भारतामध्ये हा प्रभाव हिंदू धर्माचा होता आणि त्यामुळेच हिंदू वाद आणि हिंदुत्ववाद अशा दोन धारा जन्मल्या तिसरी धारा अर्थातच शैव आहे . सर्वसाधारणपणे आपणाला मोक्षशीलता माहिती आहे आणि हेही माहित आहे की त्यांचा आधार शैव लोकांची द्वादशशीलता यमनियम किंवा जैन बौद्धांची पंचशीलता आहे . प्रश्न असा आहे की मग विज्ञानाचा उदय झाल्यानंतर विज्ञानशीलता नावाची काही गोष्ट जन्मली काय ? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे विज्ञानाला सर्वात प्रथम लक्षात आलेली गोष्ट म्हणजे जर का खरोखर ज्ञानप्राप्ती सत्यप्राप्ती करायची असेल तर मनुष्य स्वतंत्र असला पाहिजे त्यामुळेच माणसाचे सत्य शोधण्याचे स्वातंत्र्य हे मूल्य म्हणून प्रस्थापित करण्याची धडपड सर्वच विज्ञाननिष्ठ विचार प्रणालींच्या मध्ये सुरू झाली . विज्ञानाच्या हेही लक्षात आले की सत्य शो...