महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी (शैव) काय करायला हवे? ३ अर्थात ब्राह्मणांशी कसे वागावे २ श्रीधर तिळवे नाईक
ओबीसी,बीसी आणि आदिवासी यांच्यापुढे येणारा जो सर्वात मोठा प्रश्न असतो तो नेहमीच वर्णव्यवस्थेचा कट्टर पुरस्कार करणारा ब्राह्मण व्यक्तीचा असतो . अशा लोकांशी कसे वागावे हा एक फार मोठा प्रश्न आहे.
अशा कट्टर ब्राह्मण माणसाला किंवा क्षत्रिय माणसाला सर्वात प्रथम एक गोष्ट आपण सांगावी ती म्हणजे आपण सर्व होमो सेपियन आहोत . तू सुद्धा होमोसेपियन आहेस आणि मी सुद्धा होमो सेपियन आहे तुला काही स्पेशली निर्माण करण्यात आलेले नाही तू आमच्यासारखाच आईच्या पोटातून आलेला आहेस तू मला होमोसिपियन म्हणून स्वीकार आणि मी तुला होमो सेपियन म्हणून स्वीकारतो .
जर त्याने यानंतर जनेटिकचे उदाहरण दिले तर त्याला स्पष्टपणे सांग की ब्राह्मण हे मुळात युरेशियामधून आलेले आहेत म्हणजेच ते भारतीय नाहीत तरीसुद्धा आम्ही अत्यंत मनमोकळेपणाने तुमचा स्वीकार केलेला आहे तुम्ही पाहुणे होता आता यजमान झालेले आहात पण याचा अर्थ तुम्ही आमच्या डोक्यावर बसावे असा होत नाही जर का तुम्ही स्वतःच्या जन्मदत्त गुणसूत्रांच्या आधारे वर्चस्व गाजवायला जाल तर त्याच गुणसूत्रांच्या आधारे आम्ही सुद्धा तुम्ही कसे युरेशियामधून आलेले आहात हे सिद्ध करत राहू शिवाय तुझ्या जेनेटिक्स मुळे तुला असे कोणते विशेष प्राप्त झाले ते शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक पातळीवर वैज्ञानिक पुरावे देऊन सिद्ध कर असे आव्हान द्यावे .
त्याला जर स्वतःच्या गोऱ्या रंगाचा अभिमान असेल तर त्याला सांगावे की हा रंग ही देणगी नसून रंगद्रव्याच्या अभावामुळे निर्माण झालेले हे प्रकरण आहे आणि हे प्रकरण वयाने जास्तीत जास्त १० ते ५० हजार वर्षे जुने आहे तेव्हा उगाच हुशारकी मारू नकोस कारण दहा ते ५०हजार वर्षांपूर्वी तुझे सर्व पूर्वज काळेच होते . रंगद्रव्य जास्त असणे हे गरजेचे आहे कारण ते जास्त हेल्दी आहे त्यामुळे आरोग्यवान कोण असा प्रश्न आला तर कदाचित तूच आमच्यापेक्षा कमी आरोग्यवान आहेस . तर तुला आम्ही तू जास्त रोगट आहेस असे म्हणावे का असा प्रश्न विचारावा
यानंतर तो जर म्हणेल की शास्त्र असे म्हणते तर त्याला स्पष्ट सांगावे की तुझे शास्त्र हे फक्त तुझ्यावर ब्राह्मण धर्मापुरते मर्यादित आहे आम्हा शैव धर्मामध्ये त्यांची काहीही जागा नाही .
यावरही तो जास्त युक्तिवाद करत असेल तर त्याला सांगावे की मुळातच हा शब्द शूद्र नव्हता तर शुद्ध होता आणि शैव लोक तो वापरत होते आणि तुम्हाला अशुद्ध म्हणत होते कारण तुम्ही जेव्हा आलात तेव्हा आंघोळ करत नव्हता शुद्ध होत नव्हता तर जर का तू आमच्यासाठी शूद्र हा शब्द वारंवार वापरणार असशील तर आम्ही सुद्धा वारंवार तू अशुद्ध आहेस तू अशुद्ध आहेस अशा प्रकारचा शब्द प्रयोग करत राहू ते तुला चालणार आहे का ? तुम्ही जेव्हा भारतात आला तेव्हा आंघोळ करणे तुम्हाला फारसे मानवत नव्हते रोज आंघोळ करणे तुम्ही भारतात आल्यानंतर शैव लोकांच्याकडून शिकलेला आहात तेव्हा उगाच हुशारकी मारू नका . आमच्याकडे आमच्या शिवलिंगाला सुद्धा रोज आंघोळ घालावी लागते . तुझ्या वेदांच्या मध्ये तुझे देव किती वेळा आंघोळ करतात हे तू एकदा नेट नीट अभ्यासून आम्हाला सांग . यदा कदाचित हे सर्व ऐकून तो सुधारला तर त्याला सांगावे की तू आमच्या दृष्टीने पंडित आहेस परंतु पंडित असल्यासारखा विद्वान हो मानवतावादी हो . आम्ही तुला ब्राह्मण म्हणणार नाही आम्ही तुला फक्त पंडित म्हणू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव कुठल्याही वर्ण आणि जातीमधून पंडित निर्माण होऊ शकतात.
तरीही त्याचा ब्राह्मण असण्याचा गर्व कमी होत नसेल तर मात्र अशा माणसाशी संपर्क कमी करावा हेच उत्तम . मात्र आपल्या बाजूने आपण सतत वर्ण जात सिस्टीम विरोधात बोलले पाहिजे. आणि या अंगाने जेव्हा जेव्हा कोणी प्रश्न विचारेल तेव्हा त्याला फक्त एकच गोष्ट सांगावी ती म्हणजे आपण सर्व होमो सेपियन आहोत आणि आता वेळ आलेली आहे की आपण सर्वच होमोसेपियन लोकांनी या पृथ्वीची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतली पाहिजे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment