उत्तर व्यवहार , पुरोगामी वाद , शरद पवार यांची भाजप बाबत चाललेली चालढकल आणि त्या मागील त्यांची झालेली असलेली गोची श्रीधर तिळवे नाईक
शरद पवार सध्या अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत पण एकदाही भाजपमध्ये जाणार की नाही याविषयी ते ठामपणाने काही सांगत नाही . साहजिकच त्यांच्या भवताली असलेल्या अनेक लोकांचा आणि पत्रकारांचा सुद्धा प्रचंड गोंधळ उडालेला दिसतो त्यामुळे यावर हे लिखाण करत आहे.
ही एवढी चाल ढकल का आहे याविषयीची मीमांसा मी काही प्रमाणात मागील लेखात केलेली होती
आता काही आणखी काही कारणे आहेत काय हे पाहिले पाहिजे . सर्वात पहिला प्रश्न मी अनेकदा विचारलेला आहे तो म्हणजे खरोखरच हिंदू लोकांचा धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा होता का ? माझ्या मते मुळातच हा भ्रम आहे की धर्मनिरपेक्षतेला हिंदू लोकांचा संपूर्ण पाठिंबा होता वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये मुळात कधीही धर्म धर्म म्हणून येत नाही त्याच्याबरोबर मोक्ष अर्थ आणि काम हे जीवनार्थ सुद्धा फंक्शन करत असतात जे इतर प्रकारच्या विशेषता जुडाईक धर्माच्या बाबतीत किंवा रिलीजन्स बाबतीत घडत नाही. त्यामुळे जेव्हा लोक काँग्रेसला मतदान करत होते त्यामागे आणखीन काही गोष्टी होत्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य चळवळ ही काँग्रेसने चालवलेली चळवळ होती आणि त्यामुळेच आपण स्वतंत्र झालो याविषयीची भारतीय जनतेमध्ये विशेषता हिंदू जनतेमध्ये काँग्रेस विषयी विलक्षण कृतज्ञता होती. ही कृतज्ञता इतकी होती की कट्टर शैव असणारे लोकसुद्धा गांधीजींच्या मागे गेले . याशिवाय गांधी आणि नेहरू यांच्या विषयी भारतीय जनतेमध्ये विशेषतः हिंदू लोकांच्या मध्ये प्रेम होते. साहजिकच या कृतज्ञते पोटी आणि या प्रेमापोटी विशेषत: गांधी हे मोक्षवादी असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनतेचे अधिकच प्रेम होते आणि त्यांनी नेहरूंना निवडल्यामुळे नेहरूंच्यावरही प्रेम होते. तर या दोघांच्या प्रेमापोटी आणि स्वातंत्र्य बाबतीत स्वातंत्र्य मिळवून दिल्याने कृतज्ञते पोटी हिंदू लोक काँग्रेस पार्टीच्या मागे उभे राहिले त्यामध्ये धर्मनिरपेक्ष नावाचा विचार केंद्रस्थानी नव्हता शिवाय दुसरी गोष्ट अशी होती की भारतामध्ये राहणारे मुस्लिम सेक्युलर आहेत असा एक फार मोठा गैरसमज हिंदू लोकांचा झालेला होता प्रत्यक्षामध्ये १९८० च्या आसपास हा किती खोटा आहे हे कळाले मुस्लिम सत्यशोधक समाजाची चळवळ हळूहळू कशी फापलत गेली तेही हिंदू लोकांनी पाहिले त्यांनी इस्लाम मध्ये वाढत चाललेल्या कट्टरतेला पाहिले इस्लाम मधल्या तथाकथित बुद्धिमान लोकांनी कट्टर इस्लामपुढे घातलेले लोटांगण पाहिले आणि नाही म्हटले तरी हिंदू लोकांच्या मनावर हळूहळू या गोष्टींचे आघात होत गेले.
आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सामान्य जनता कधीही तुमच्या केवळ विचार प्रणालींना बघत नाही त्यापेक्षा ती प्रत्यक्ष लोक व्यवहार कसा चालत असतो आणि हा लोक व्यवहार खरोखरच आपल्याला शिकवल्या गेलेल्या विचार प्रणाली प्रमाणे चालू आहे का त्याकडे लक्ष ठेवून असते आणि मुस्लिम लोकांच्या बाबतीत हेच झाले. जेव्हा मुस्लिम लोकांचा लोक व्यवहार हा प्रचंड धर्मकेंद्री आहे आणि तो तसाच राहिलेला आहे तो अजिबात सेक्युलर झालेला नाही आणि धर्माबाबत मुस्लिम लोक कट्टर आहेत इतकेच नव्हे तर ते लोकसंख्या वाढवत आहेत हे स्पष्ट आणि स्वच्छ पणाने लोकांना कळायला लागले तेव्हा इस्लाम बाबत भूमिका बदलायला सुरुवात झाली मुख्य म्हणजे बुरख्या विषयीचा आग्रह २०१३ नंतर याबाबतीत कमालीचा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे हे अनेक पुरोगामी लोकांनाही लक्षात येत नाही याबाबतीत आधी हिंदू गाफील होते त्यामुळे काँग्रेसचे फावले परंतु जेव्हा अक्कल आली तेव्हा हळूहळू गोष्टी स्पष्ट झाल्या पण याबाबतीतली व्हॅलिडीटी कन्फर्म होत नव्हती आणि ही व्हॅलिडीटी शहाबानो प्रकरणांमध्ये कन्फर्म होत झाली. यावेळी सुद्धा स्वतःच्या सहनशीलतेसाठी का होईना परंतु काँग्रेसला बदलण्यासाठी म्हणून लोकांनी संधी दिली. मात्र तरीसुद्धा एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या काळामध्ये एक मोठा बदल १९९० नंतर भारतामध्ये झाला तो म्हणजे भारतामध्ये सुद्धा उत्तर आधुनिकता आली. प्रस्थापित व्हायला सुरू झाली . उत्तर कार्पोरेट वाद आला प्रस्थापित व्हायला लागला. हा उत्तर कॉर्पोरेट वाद प्रामुख्याने नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये फक्त आर्थिक होता परंतु तो हळूहळू प्राथमिक पातळीवर सुद्धा आला आणि उत्तराधुनिकतेने जो परंपरेचा पुरस्कार केला होता आणि 1960 स*** उदयाला आलेल्या कला क्षेत्रामध्ये जो धर्माचा आणि परंपराचा पुरस्कार केला गेला होता त्यामुळे धर्म हा पुन्हा एकदा परतला धर्माचे हे परत येणे नेमके काय आहे हेच आपल्याकडे विचारवंत लोकांना कळाले नाही धर्मनिरपेक्ष वादामुळे एक फार मोठा गैरसमज असा पसरला होता की धर्म ही एक घरात करायची गोष्ट आहे ती वैयक्तिक आहे हा एक खोटा इतिहास पुरोगामी वादी लोकांनी रचला होता आणि स्वतःची च फसवणूक करून घेतली होती धर्म घरात ठेवा असे सांगणे म्हणजे प्रत्यक्षामध्ये राजकीय विचार प्रणाली घरात ठेवा असे सांगणे होते आणि हेच अनेक पुरोगामी लोकांच्या आणि धर्मनिरपेक्ष लोकांच्या लक्षात आले नाही . प्रत्यक्षामध्ये मोक्ष हा वैयक्तिक असतो धर्म नव्हे . प्रत्यक्षामध्ये धर्म ही एक राजकीय प्रणाली असते आणि ती नेहमीच पूर्वीसुद्धा राजकीय प्रणाली होती आणि तिच्या आधारेच अनेकदा राज्य व्यवस्था चालत होती धर्माप्रमाणे अनेकदा राज्य व्यवस्था बदलत सुद्धा होती म्हणजे यथा राजा तथा प्रजा या न्यायाप्रमाणे राजाचा धर्म तोच आपला धर्म असे मानणारे अनेक लोकसमूह अस्तित्वात होते साहजिकच जेव्हा वैष्णव धर्म यादव लोकांनी स्वीकारला विशेषता केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा राजे लोकांनीच वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हा लोकांनी तो राजाचा धर्म आहे म्हणून स्वीकारला पण याचा परिणाम असा झाला की सर्वत्र वैष्णववाद वाढत गेला आणि साहजिकच तो हळूहळू हिंदू धर्म बनत गेला म्हणजेच धर्म हा राजकीयच असतो पण ही मूलभूत गोष्ट न कळाल्याने आणि धर्मही काहीतरी कुटुंबात करायचे कर्मकांड असते असा गैरसमज करून घेतल्याने पुरोगामी लोक धर्माबाबत प्रचंड बेसावध राहिले त्यांच्या दुर्दैवाने सर्वात प्रथम इस्लामने धर्म ही राजकीय विचार प्रणाली म्हणून पुन्हा प्रस्थापित केली इराण मध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती हळूहळू सर्वत्र पसरत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुद्धा ती राजकीय विचारप्रणाली म्हणून प्रस्थापित झाली. साहजिकच भारतातला मुसलमान सुद्धा या बदलांच्यामुळे अतिशय मूलभूतपणे पुन्हा बदलला आणि अत्यंत कर्मठ झाला . त्यांचा लोक व्यवहार कर्मठ झाला आणि ही गोष्ट सरळ सरळ आणि स्पष्टपणे हिंदू लोकांना दिसायला लागली . मुस्लिम देशात जाऊन परतलेला मुस्लिम ही एक वेगळीच कॅटेगरी तयार व्हायला लागली आणि तिच्या प्रभावाखाली अनेक मुस्लिम येऊ लागले. इस्लामचे जागतिकीकरण पुन्हा एकदा मुस्लिम मनामध्ये वावरायला लागले आणि आपण सर्व एक आहोत ही भावना पसरायला लागली साहजिकच भारतामध्ये सुद्धा धर्मराज्य स्थापन करण्याचे स्वप्न अनेक मुस्लिम लोकांना पडायला लागले याची प्रतिक्रिया हिंदू लोकांच्याकडून येणे अपरिहार्य होते आणि त्यामुळेच भाजपला वाव मिळाला. उत्तराधुनिकतेने घडवून आणलेला हा राजकीय बदल आज सुद्धा अनेक पुरोगामी लोकांना कळत नाही मी सुरुवातीपासूनच उत्तर आधुनिकतेच्या विरोधात आणि परंपरेच्या विरोधात ठामपणे थांबलो परंतु ही गोष्ट अनेकांच्या नीट लक्षात आली नाही. माझ्या दृष्टीने मोक्ष हा सर्वाधिक महत्त्वाचा होता पण दुर्दैवाने मोक्षावर विश्वास नसल्यामुळे पुरोगामी चळवळ सर्वच पातळीवर फापलत गेली . गांधींनी धर्माचे नाव घेतले असेल पण प्रत्यक्षात त्यांचे सगळे राजकारण हे जितके धार्मिक होते त्यापेक्षा अधिक मोक्षिक होते पुरोगामी लोकांच्या हेही लक्षात आले नाही याचा परिणाम असा झाला की उत्तर आधुनिक तत्त्वज्ञान म्हणून धर्म प्रस्थापित झाला आणि आज तो उत्तर आधुनिक राजकीय तत्त्वज्ञान म्हणून संपूर्ण इस्लाम जगतात आणि हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही भारताच्या जनमानसामध्ये वावरत आहे तुम्हाला आवडो अगर नावडो पण हा बदल घडलेला आहे उत्तर आधुनिकतेकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ही एक पुरोगामी लोकांनी केलेली फार मोठी चूक होती. ते मूर्खासारखे ओरिएंटालिझम सारखे पुस्तक देशी वादाचे पुस्तक समजत होते प्रत्यक्षामध्ये त्याचा हिडन अजेंडा इस्लाम वादच होता . यासारख्या पुस्तकांनीच मुळात इस्लामला नवा तात्विक पाया दिला आणि त्यातून पुढचे सगळे कट्टर धार्मिक गोंधळ तयार झाले.
यामुळेच आता ज्यांना शहाणपण आलेले आहे अशा सर्व राजकीय नेत्यांच्या पुढे धर्म हा राजकीय प्रणाली म्हणून उभा राहिला आहे आणि तो विजयी होताना सतत दिसतो प्रश्न असा आहे की मग त्याला शह कसा देणार ? आणि इथेच सर्व पुरोगामी लोकांचा गोंधळ उडालेला दिसतो आणि त्याला शरद पवार सुद्धा अपवाद नाहीत . याचे कारण असे की शरद पवारांना धर्म केंद्रस्थानी आलेला आहे हे पटते परंतु त्याचबरोबर त्यांच्यावर झालेले सेक्युलर्स संस्कार हे अत्यंत घनदाट असल्याने त्यांना तोही सोडवत नाही आणि म्हणूनच ही सगळी चाल ढकल धरपकड चाललेली आहे .ते अजूनही एका निष्कर्षाला पोचलेले नाहीत म्हणजे काय करावे याविषयी गोंधळलेले आहेत याचे कारण त्यांच्या समोरची परिस्थिती अतिशय गोंधळाचीच आहे . जे कट्टर डावे आहेत ते आरामात या संदर्भात भूमिका घेऊ शकतात जे आंबेडकरवादी आहेत तेही अशी भूमिका घेऊ शकतात कारण त्यांच्याजवळ बौद्ध धर्म आहे पण काँग्रेस अशी कधीच कट्टर डावी किंवा बौद्ध धर्म स्वीकारणारी नव्हती . अपवाद इंदिरा गांधींच्या पासून सुरू झालेली काँग्रेस पण ती सुद्धा फक्त सात वर्षे टिकली राजीव गांधींच्या काळात उलट काँग्रेस उजवी झाली आणि नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी ती पूर्णच उजव्या बाजूने झुकवली मात्र कार्पोरेट वादाला पूरक होईल असा माहोल तयार करताना गरीब लोकांशी असलेले नाते काँग्रेसने कधीही तोडले नाही. खरा प्रॉब्लेम उत्तराधुनिकतेने धर्म केंद्रस्थानी आणल्यामुळे झालेला आहे आणि पवारांची खरी गोची धर्म या संदर्भात झालेली आहे भाजपकडे जावे तर सेक्युलर वादाची वाट लागते आणि सेक्युलर बरोबर रहावे तर हा वाद आता अल्पसंख्यांक झालेला आहे या वादा बरोबर लोक नाहीत कदाचित ते पूर्वीही नव्हते पण त्यावेळी उत्तर आधुनिकता आलेली नव्हती आता ती आल्याने आणि लोक जीवनामध्ये स्थिर झाल्याने धर्म ही गोष्ट सुद्धा एक राजकीय विचारप्रणाली म्हणून पुन्हा परतली आहे . आणि हे सर्व उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानाने घडवलेले आहे किंबहुना उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानाला कदाचित आपण काय करतो आहोत ते लक्षातच आले नाही . इस्रायल निर्मितीचे समर्थन करता करता आणि इस्लामला संरक्षण देता देता हे लोक आपण धर्माला केंद्रस्थानी आणत आहोत हे पाहायला विसरले . याचा परिणाम असा झाला की आज जगात सर्वत्रच धर्मनिरपेक्षता वाद हा हळूहळू अल्पसंख्यांक बनत चाललेला आहे अपवाद फक्त ५२ % नास्तिक झालेल्या इंग्लंड सारख्या नास्तिक देशांचा आहे पण या नास्तिक लोकांना धर्मनिरपेक्षता स्वीकारावी लागते आणि तिथे मुस्लिम मात्र धर्मसापेक्षता घेऊन घुसतात आणि या धर्मसापेक्षतेचे काय करावे हे या नास्तिक राजवटींना कळत नाही तिथे सुद्धा एक विचित्रच प्रॉब्लेम झालेला आहे आणि आज ना उद्या त्यांना तो हाताळावा लागेलच .
धर्मनिरपेक्षता वाद इतका अल्पसंख्यांक होईल याची पवारांना कदाचित सर्वांनाच अंदाज आला नाही आणि आता धर्म सापेक्षतावाद एक नवे तत्त्वज्ञान म्हणून आल्याने सगळा गोंधळ उडालेला आहे. मुख्य म्हणजे लोकच आता धर्मसापेक्षता वादाच्या प्रेमात पडलेले दिसतात अशावेळी तुम्ही काय करणार ?
इंग्रज विजयी झाले तेव्हा आपले सर्व पराभव हे आपल्या धर्मामुळे झालेले आहेत याची स्पष्ट आणि स्वच्छ कल्पना १९ व्या शतकामध्ये आली आणि या लोकांनी आपले स्वतःचे स्वतंत्र आणि समांतर धर्म निर्माण केले त्यातूनच ब्राह्मो समाज ,आर्य समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन ,थिऑसॉफी सोसायटी ,नवयान यांच्यासारख्या नव्या धार्मिक चळवळी निर्माण झाल्या या लोकांनी एका बाजूला आपले कनेक्शन परंपरेशी जोडले आणि दुसऱ्या बाजूला ते नवे पण केले
मला स्वतःला या गोष्टी स्पष्टपणे दिसल्या म्हणूनच मग मी संपूर्ण शैव परंपरेचे नूतनीकरण घडवून तिला एकविसाव्या शतकात दाखल करण्याचे एक मिशनच उभे केले हळूहळू का होईना पण त्या मिशनला सक्सेस मिळत जाताना दिसते विचार पसरताना दिसतो पुरोगामी पण जमिनीवर असलेल्या लोकांच्या पुढे असे काही करण्याशिवाय पर्याय नाही आणि नव्हता .
वस्तुस्थिती अशी आहे की इस्लामवादाला शह देण्यासाठी म्हणून जो युरेशियन हिंदुत्ववाद आलेला आहे तो काय करणार आहे ? त्यांची सत्ता आलेली आहे हे तर उघडच आहे पण मुळात भविष्यात काय ? माझ्या मते भविष्यामध्ये आत्तापर्यंतचा सगळा युरेशियन लोकांचा इतिहास लक्षात घेता या लोकांनी मुस्लिम लोकांची युती केली तर मला आश्चर्य वाटणार नाही किंबहुना मोदींच्या विरोधात मोहीम चालवताना मोदी नकोत पण मुस्लिम चालतील अशा प्रकारची भूमिका काही अतिशहाण्या सवर्ण लोकांनी घेतलेली दिसते साहजिकच याचे पडसाद ओवेसी बरोबर झालेल्या युतीत दिसते हे होणारच होते कारण या लोकांनी हे केलेलेच आहे प्रश्न असा आहे की याला शह कसा देणार ? तर याला शह देण्याचा उपाय एकच असतो एक तर या लोकांच्या ब्राह्मणी , वैष्णव हिंदुत्वाला साईडलाईन करून शैव हिंदुत्व निर्माण करणे यामुळे दोन गोष्टी होतील एक तर भाजप स्वतःच शैव हिंदुत्ववादी होईल किंवा शैव हिंदुत्ववाद स्वतःची नवी हिंदुत्ववादी पार्टी तयार करेल किंवा मग बहुजनांचा सांस्कृतिक धर्म म्हणून शैव धर्माचा स्वीकार करून नवसत्यशोधक पद्धतीचे शैव आधुनिक तत्त्वज्ञान तयार करणे जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म या राजकीय विचार प्रणालीला शह देऊ शकत नाही. 19 व्या शतकामध्ये जी गोष्ट राजाराम मोहन राय महात्मा फुले स्वामी विवेकानंद आणि विसाव्या शतकात गांधी आणि आंबेडकर यांना कळली ती आत्ताच्या पुरोगामी लोकांना कळत नाही कारण संपूर्ण पुरोगामी वाद हा जडवादी झालेला आहे . त्याचा मोक्षाशी काहीही संबंध उरलेला नाही आणि जोपर्यंत पुरोगामी वाद मोक्षाशी पुन्हा जोडला जाणार नाही तोपर्यंत कोणतीही नवी धर्मकेंद्री राजकीय विचार प्रणाली पुढे येऊ शकत नाही याबाबतीत मला जे करायचे आहे ते मी केलेलेच आहे आणि करतोच आहे .
प्रश्न असा आहे की शरद पवार असा दोन्ही बाजूंपैकी एक पर्याय निवडणार आहे का ? शरद पवार यांची तशी वैचारिक ताकद आहे का ? त्यांची ही वैचारिक ताकद नाही ही त्यांची सर्वात मोठी मर्यादा आहे शरद पवारांचा मोक्षाशी काडीचाही संबंध नाही इतकेच कशाला त्यांचा धर्माशी फार संबंध नाही त्यामुळे या अंगाने काही निर्णय घेता येणे त्यांना शक्य होत नाही आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने विचार करून गेली तीस वर्षे ते चाललेलेच आहेत आता तिथे ते थांबलेत आणि पुढे जाता येत नाही कारण पुढे समोर उत्तर आधुनिकता आणि धर्म स्वतःचे दोन चेहरे घेऊन उभे आहेत .
त्यामुळे शरद पवारच काय कुठल्याही पुरोगामी माणसाकडून ज्याला धर्म ही राजकीय विचार प्रणाली म्हणून प्रस्थापित झालेले आहे हे कळलेले आहे त्याला ताबडतोब निर्णय घेता येणे शक्य नाही . याला अपवाद फक्त सत्तेविषयीचे आकर्षण होऊ शकते अशा प्रकारचे आकर्षण शरद पवार यांच्यामध्ये या वयामध्ये सुद्धा आहे का हा खरा प्रश्न आहे जर का ते तसे असेल तर खूप ताबडतोब निर्णय घेऊन शरद पवार भाजपकडे जातील आणि एका अर्थाने अजित पवार यांना फॉलो करते करतील कारण अजित पवारांना सत्तेनेच आंधळे बनवले आणि ते गेले . आता प्रश्न तोच आहे की जो अनुभवी म्हातारा मानला गेला आहे तो तरुण आणि पुतण्या असलेल्या माणसाला फॉलो करणार आहे का ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment