काँग्रेस , चांगले काम , पवारांचे मॉडेल आणि व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर अनेक गोष्टींच्यावर चर्चा होणे अटळच होते आणि ते होताना दिसते आहे 

आता आपण सर्वांनी एक गोष्ट मुळातली समजून घेतली पाहिजे ती म्हणजे काँग्रेसचे मॉडेल! हे मॉडेल काही आज जन्मलेले नाही ते काँग्रेसच्या जन्माबरोबरच जन्मलेले आहे . या मॉडेल चे मुख्य सूत्र एक तर सत्तेत असावे किंवा सत्ते जवळ असावे . संपूर्ण ब्रिटिश काळाचा आपण अभ्यास केला तर आपणाला काँग्रेसने(आणि हिंदुत्ववादी आणि मुस्लिम लीगने सुद्धा ) ही गोष्ट सतत केलेली दिसते . म्हणजे ब्रिटिशांच्या जवळ राहायचे आणि सत्तेत वाटा मागत राहायचा . निवडणुका झाल्या की कोणाशीही युती करायची आणि सत्तेवर यायचे . अगदी इंदिरा गांधी पराभूत झाल्या झाल्या काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्याला कारण ही सत्तेजवळ राहण्याची उर्मी होती आणि सवय होती काँग्रेस कुठलीही असो राष्ट्रवादी असो नाहीतर सोनिया गांधींची काँग्रेस असो नाहीतर अजित दादांची काँग्रेस असो या सर्वांचा अजेंडा काहीही असला तरी त्या अजेंड्याचे मुख्य सूत्र हेच राहणार की एक तर सत्तेत राहायचे किंवा सत्तेभोवती राहायचे अगदी अशोक चव्हाण यांच्यापासून छगन भुजबळांच्या पर्यंत सगळ्यांना हा काँग्रेसचा रोग लागलेला आहे . सत्ता ही गोष्टच अशी आहे की ती तुम्हाला मोह पाडते seduce करते आणि मग तुमचे पतन घडवते . तुम्ही सर्व तुमची तत्त्वे तुमचा धर्म तुमची विचार प्रणाली खुंटीला टांगून ठेवता. जगाच्या संपूर्ण राजकीय तत्त्वज्ञानामध्ये कौटिल्य किंवा मेक्यावली अजिबात मरत नाहीत त्याचे सर्वात मोठे कारण हे दोघे फक्त सत्ता प्रणाली सांगतात . यांच्या राजकीय विचाराच्या केंद्रस्थानी फक्त सत्ता असते आणि सत्ता कशी मिळवायची सत्ता कशी टिकवायची आणि सत्ता कशी वाढवायची या तीन तत्त्वाखेरीज हे लोक काहीही बोलत नाहीत आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वास्तववादी राजकारण वास्तववादाच्या व्यवहारवादाच्या आणि उत्तर व्यवहार वादाच्या दृष्टिकोनातून बघायला लागता तेव्हा तुम्हाला या लोकांचा त्यांच्या विचारांचा प्रत्यय कायम येत राहतो आणि जगातले सर्वात थोर राजकीय विचारवंत हेच आहेत असे वाटायला लागते हे लोक राजकारणाची आणि राजकारणी लोकांची मानसिक जडणघडण काय आहे हे पक्के जाणतात आणि हे उपदेश सुद्धा त्याच पद्धतीचा करतात त्यामुळे जेव्हा मेक्यावलीचे प्रिन्स हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ते ताबडतोब संपले परंतु सार्वजनिक जीवनात मात्र त्या काळातला एकही राजा किंवा राजकारणी किंवा सरंजामदार ते पुस्तक उघडपणे दाखवत नव्हता . त्याचे कारण त्यातला उपदेश प्रत्येक जण अमलात आणत होता आणि प्रत्यक्ष मात्र आपण अमलात आणतो हे मात्र लपवत होता . आजही ही दोन पुस्तके अनेकांना राजकीय आणि राजकारणी बायबल आहेत . कसलेही नैतिक चाड नसलेले असे हे राजकारण हे लोक अत्यंत उघडे आणि नागडे करून दाखवतात आणि वाईट गोष्ट अशी आहे की जगाच्या इतिहासामध्ये हे दोन लोकच जे सांगत आहेत त्याप्रमाणे राजकारणी वागत आहेत मात्र हे कधीही स्वतःच्या डोक्यावर blame दोष घेत नाहीत ते कायमच धर्मयुगामध्ये पुरोहित लोकांच्या डोक्यावर सर्व दोष मारत होते पुरोगामी ज्ञानयुगामध्ये विज्ञान युगामध्ये यांनी सर्व दोष सामाजिक राजकीय आर्थिक व्यवस्थेच्या या व्यवस्थेतील संविधानाच्या माथ्यावर मारायला सुरुवात केली आणि यामध्ये गंमत अशी होती की व्यवस्था निर्माण करणारे हेच होते पुढे मग लोकशाहीचा काळ प्रस्थापित झाल्यानंतर या लोकांनी इतर पक्षांना ब्लेम द्यायला सुरुवात केली म्हणजे जो जो विरोधी पक्ष आहे किंवा आसपासचा पक्ष आहे त्याला टार्गेट करायचे. प्रत्येक गोष्टीला विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला जबाबदार धरायचे असा एक तमाशा सुरू झाला कलगीतुरा सुरू झाला उत्तर आधुनिक कालखंडामध्ये मात्र या लोकांनी प्रशासन सांभाळणाऱ्या लोकांना आणि मतदान करणाऱ्या लोकांना दोष द्यायला सुरुवात केली साहजिकच आता प्रशासक आणि लोक हेच कसे मूलतः स्वभावानेच भ्रष्ट असतात हे सांगितले जाते शिवाय व्यवस्था आणि व्यवस्थेने निर्माण केलेले संविधान यांच्या विरोधात बोलून तेच कसे जबाबदार आहे किंवा पुरोहित वगैरे जुने लोक हेच कसे जबाबदार आहेत हे नेहमीच सांगितले जाते . यामध्ये त्यांचा वाटा नाही असे म्हणत नाही परंतु राजकारणी ज्या तऱ्हेने या सर्व गोष्टींचा वापर अतिशय चपखल पद्धतीने करत असतात तो वाटा आणि भूमिका अनेकांना लक्षात येत नाही 

या सगळ्याचा आणि कारणांचा आता चौथ्या नवतेमध्ये अधिकाधिक चोथा होत जाणे अटळ आहे त्यामुळे एक वेळ अशी येऊ शकते की जेव्हा वेगवेगळी सोशल नेटवर्किंगची सिस्टीम वापरत अनेक जालांच्यावर चिन्हविरोध करत विरोधी महाजाल विंचरत वावरत लोकच सत्ताधारी लोकांच्या विरोधात उभे ठाकतील त्यामुळे भविष्यात अधिकाधिक सेन्सॉरशिपस वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणी लोकांच्याकडून लादली गेल्या तर आश्चर्य वाटणार नाही नेट लॉकिंग हे भविष्य काळामध्ये राजकारणी लोकांचे फार मोठे हत्यार असेल . याशिवाय तुमच्या नेटवर्कचे रिप्लेसमेंट डिस्प्लेसमेंट प्लेसमेंट हे सर्व काही अधिकाधिक ताब्यात घेऊन त्या अंगाने वाटचाल केली जाईल . त्यासाठी अधिकाधिक डिजिटल कॅमेरे व्यापारले जातील वापरले जातील . एकंदरच हा सगळा लढा चिन्ह पातळीवर लढला जाईल आणि नंतर मग तो प्रत्यक्षात उतरवला जाईल असे सध्याचे वातावरण आहे यासाठी अर्थातच सोशल नेटवर्सवर असलेली खाजगी मालकी ही हळूहळू सार्वजनिक करता आली तरच ती कार्यान्वित राहील अन्यथा लोक स्वतःची अशा प्रकारची नेटवर्क सिस्टीम तयार करत समांतर आणि प्रायोगिक नेटवर्सेस(Netverses )तयार करतील यासाठी नेमका किती काळ जाईल हे सांगणे कठीण आहे माझे स्वतःचे म्हणणे असे की त्यापेक्षा राजकीय पक्षांनी स्वतःला सुधारावे आणि ही वेळ येऊ नये . राजकारणी मरतात पण खुर्ची जिवंत राहते हे सत्तेच्या राजकारणातले सर्वात मोठे सत्य आहे . खुर्ची अमर आहे आणि तीच राजकारणाला राजकारणी माणसाला आयुष्य देते त्याचे आयुष्य सत्ताबाज बनवते . त्यामुळेच प्रत्येक राजकारणी अंतिमतः सत्ताबाजच बनतो. याला कदाचित थोडाफार छेद मिळाला तर मोक्षाकडूनच मिळू शकतो परंतु आजच्या काळामध्ये हे अधिकाधिक अवघड होऊन बसलेले आहे मात्र ते अशक्य आहे अशातली गोष्ट नाही विशेषत: जेव्हा एखाद्या राजकारणी माणसाला भिडत समोरच कुणाचा तरी किंवा स्वतःचा मृत्यू किंवा अपघात दिसतो तेव्हा माणसे बदलतात माझा एक बालपणातला मित्र सुविद लटोरे हा अशा तऱ्हेने बदललेला मी बघितलेला आहे. एक मृत्यूच आहे जो राजकारणी लोकांना घाबरवतो म्हणून तर हे लोक पिरॅमिड वगैरे बांधून अमर व्हायला धडपडत असतात. अलीकडे पिरॅमिड बांधून काही आपण अमर होत नाही म्हणून हे लोक स्वतःला देव बनवण्याच्या किंवा किमान आपले पुतळे बनवण्याच्या मागे असतात . प्राचीन काळी धर्म उघड उघडपणे हे सर्व करायचा आता ती ही संधी नाही . तरीपण राजाला देव बनण्याचे चान्सेस अजूनही असल्याने विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये तो अजूनही असल्याने अनेक राजकारणी या मागे लागलेले असतात किंबहुना शिवाजी महाराजांचे मंदिर झाले त्याला एकाही पुरोगामी राजकारणी माणसाने विरोध केलेला नाही याचे सर्वात मोठे कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आपलेही मंदिर भविष्यात होण्याची यामध्ये शक्यता आहे असे दिसत असते . अमर होण्याची ही लालसा आहे पण अनेकदा ती चांगले काम करायला प्रवृत्त करू शकते. आपण यामध्ये जर का त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही चांगली कामे करा आणि मग स्वतःचे नाव द्या असे सांगितले तरच काहीतरी होऊ शकते . शेवटी प्रत्येकाला इतिहासामध्ये आपले नाव ठेवून जायचे असते . असो. ज्याला आपले स्वतःचे नाव सुद्धा ठेवून घ्यायचे नसते किंवा इतिहासात अमर व्हायचे नसते असा राजकारणी माणूस हळूहळू अत्यंत क्रूर ,निष्ठुर , नीच आणि नालायक बनत जातो . खरे तर आपल्याला या लोकांना घाबरायलाच लागते कारण या लोकांना मग काहीच असे आपण देऊ शकत नाही की जे त्यांना चांगली कामे करायला प्रवृत्त करेल. प्राचीन काळी पुरोहित निदान स्वर्ग आहे असा दिलासा दाखवून त्यांच्यावर काही प्रमाणात तरी कंट्रोल ठेवायचे आता हा कंट्रोल गेला कोणाचाही स्वर्गावर नरकावर विश्वास उरलेला नाही आणि राजकारणी लोकांचा तर अजिबात नाही त्यामुळे अमर होणे ही आसक्तीच आता फक्त रिमोट कंट्रोल सारखी यांना नियंत्रित करू शकते अन्यथा नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चांगल्या गोष्टींना मीडिया प्रसिद्धी देतच नाही म्हणजे बारामती मध्ये अतिशय अप्रतिम असे हॉस्पिटल अजितदादा पवार यांनी निर्माण केले होते हे लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर कळते आणि सर्वात वाईट गोष्ट हीच असते म्हणजे मीडिया जेवढ्या वाईट बातम्या देता येईल तेवढ्या देतो पण चांगल्या कामाबद्दल जे कव्हरेज मिळायला हवे ते मिळत नाही वास्तविक हे कव्हरेज चांगल्या कामांना मिळत गेले तर सुद्धा हे लोक सुधारण्याची शक्यता आहे पण पत्रकार लोकांना टेररिस्ट लोकांच्या ऍक्टिव्हिटी जास्त महत्त्वाच्या वाटतात त्याला काय करणार ? मी साधे याचे उदाहरण देतो जे कृष्णमूर्ती हा एक आधुनिक बुद्ध होऊन गेला मराठी माध्यमातील एकाने सुद्धा त्या माणसाची मुलाखत घेतलेली मला दिसलेली नाही . मराठी पत्रकारितेचा सगळा नटदृष्टपणा यामध्ये दिसतो . हीच गोष्ट निसर्ग दत्त महाराज यांची आहे . मेल्यानंतर मीडिया आदर देतो परंतु हा आदर काहीही कामाचा नाही विशेषता तो राजकारणाबाबत काहीच कामाचा नाही कारण राजकारणी लोकांना जिवंतपणे आपण अमर होणार आहोत असे वाटणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचा उपाय एकच आहे या लोकांनी केलेल्या प्रत्येक कामाला अत्यंत धुमधडाक्यात प्रसिद्धी देणे . हा लोकांच्या बाजूने होणारा लोक व्यवहार असेल आणि तो लोक व्यवहार पार पाडण्याची जबाबदारी पत्रकारांच्या वर आहे. बारामती हे गाव याबाबतीत फार उत्तम गाव होते पवार घराण्यांनी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची हे लोक ज्या तऱ्हेने एकमेकांशी चर्चा करत ती चर्चा फार बघण्याजोगी गोष्ट असायची हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय त्यामुळे साहजिकच चांगले काम करायला पवार घराण्याला कायमच प्रोत्साहन लाभलेले दिसते हे खरे तर प्रत्येक मतदारसंघात व्हायला हवे पण त्याचबरोबर आता त्याला मीडियामध्ये पण प्रचंड प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे .निदान अजित पवार गेल्यानंतर एवढी बेसिक गोष्ट जरी आपल्या मीडियाला कळली तरी खूप झाले तुम्ही जेवढा जिवंत माणसावर फोकस ठेवाल तितका तो अधिकाधिक जास्त चांगली कामे करेल शेवटी त्या माणसाला सुद्धा मान्यता हवी असते प्रोत्साहन हवे असते आणि तेच जर का तुम्ही देणार नसाल तर कठीण आहे .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय